पोलीस अधिकाऱ्यावर तलवार हल्ला, 3 पोलीस कर्मचारी,व चार नागरिक जखमी
अमळनेर :- सध्या राज्यातील अनेक भागात तणावाचे वातावरण असून आज वादग्रस्त प्रकरणामुळे धुळे शहरात देखील मोर्चा काढण्यात आला होता.अशातच अमळनेर शहरातील जिंनगर गल्लीत काल रात्री दोन गटात हाणामारी होत दगडफेक झाली. याप्रकरणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमळनेरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्यात वादग्रस्त पोस्टमुळे तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावरून राज्यातील अनेक भागात आंदोलन करण्यात येत आहेत. याच दरम्यान काल रात्रीच्या सुमारास अमळनेर शहरात अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. अमळनेर शहरात 10 जून सकाळी 11.00 वाजल्यापासून ते 12 जून सकाळी 11.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
आवश्यकता वाटल्यास संचारबंदीमध्ये वाढ करणेत्त येईल. अमळनेर शहरातील नागरिकांनी संचारबंदी काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग यांनी केले
दरम्यान शहरातील एका भागात दोन तीन तरुणांमधे किरकोळ बाचाबाचीमधून हाणामारी झाली. यानंतर काही वेळात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली. हा प्रकार अमळनेर शहरात दगडी गेट परिसरात जिंनगर गल्लीसह गांधलीपुरा भागात घडली. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसाना माहिती मिळताच पोलीस पथक पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र यात तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह तीन ते चार नागरिकही जखमी झाले आहे. घटनेनंतर काही वेळात पोलिसांची कुमक पोहोचताच परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या भागात मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून तणाव पूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या 32 तरुणांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात अटकेची कारवाई सुरू केली असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस अधिकाऱ्यावर तलवार हल्ला,पोलीस व नागरिक जखमी.
९ रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जिनगर गल्लीत दोन गटात दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख पोलीस ताफ्यासह हजर झाले. काही वेळात प्रभारी अधिकारी रामदास वायकोडे, पारोळा पोलिसांसह हजर झाले. तेव्हा दोन्ही गटाच्या हातात लाठ्या- काठ्या दगड होते. पोलीस त्यांना शांततेचे आवाहन करीत असताना जमावाने घोषणाबाजी केली आणि पोलिसांवर फरश्या व दगडांनी हल्ला चढवला. इरफान जहुर बेलदार याने तलवारीने सपोनि राकेशसिंग परदेशी यांच्यावर वार केला, त्यांनी तो चुकवला. पण त्यांच्या पायाला लागून हाड फ्रॅक्चर झाले. तसेच जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक देशमुख, हितेश बेहरे, राहुल पाटील, धुळे आरसीएफचे अनिल सोनवणे ,मगनराव घटे हे पोलिस कर्मचारी जखमी झाले.
काय घडलं नेमकं?
दरम्यान, शुक्रवारी रोजी रात्री 9 वाजता सराफ गल्लीतील जिनगर गल्लीत दगडफेकीला सुरुवात झाली. काही समाजकंटकांनी दगडफेक केली, त्यामुळे दोन समाजातील लोकं आपसात भिडले व परस्परांवर दगडफेक करण्यात आली. लहान मुलांवरुन हा प्रकार घडल्याचे समजते. काल नऊ वाजेच्या सुमारास लहान मुलांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. दगडफेक एवढी मात्र तरीही दगडफेक सुरुच होती. त्यानंतर सुभाष चौक, गांधलीपूरा आदी परिसरातही दगडफेक झाली. परिस्थितीचे गांभीर्य पाहता सहाय्य पोलिस अधिक्षक ऋषिकेश पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
सध्या परिस्थिती नियंत्रणात.
सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दंगलीचे नेमके कारण समजू शकले नाही. सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिस दंगलीमागील संशयितांचा शोध घेत आहेत.
उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांच्या आदेशाने कलम 144 अन्वये शहरात 10 जून सकाळी 11 वाजेपासून ते 12 जून रोजीच्या सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदीचे अमळनेर शहरात शांतता व कायदा व परिस्थिती नियंत्रणात आणू लागले. सुमारे बारा वाजेपर्यंत हळुहळु सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आदेश लागू करण्यात आले आहेत.
हे पण वाचा
- Viral Video:नवरीला लागली हळद,रात्री नाचताना नवरीच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,ज्या दिवशी तिचे लग्न त्याच दिवशी निघाली अंत्ययात्रा, दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा
- चुलत दीरासोबत अनैतिक संबंध, पती पत्नीमध्ये वाद, प्रियकराच्या मदतीने पत्नीने शेतकरी पतीचा केला खून; अन् अपघाताच्या केला बनाव.
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाने घेतले भिकाऱ्याचे सोंग; पंचायत समिती कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन.
- नवरदेव वऱ्हाडीसह लग्नासाठी मांडवात आला, अचानक मधमाशांनी केला हल्ला,नवरदेव नवरीला घेऊन पळाला,19 वऱ्हाडीं जखमी.
- दुसऱ्या तरुणाशी लग्न का केलं अस म्हणत नवविवाहित दाम्पत्याची कार अडवून नवरीच्या अपहरणाचा प्रयत्न; पण झाले भलतेच….