शासन आपल्या दारी योजनेंतर्गत ५५४ प्रकरणे मंजूर.- तहसीलदार सुचिता चव्हाण.

Spread the love

एरंडोल :-राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ योजनेंतर्गत शासनाच्या विविध योजनांमधील ५५४ प्रकरणे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी दिली.तसेच २०४ प्रकरणांमध्ये कागदपत्रांची त्रुटी असल्यामुळे सदर प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आले असून लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करावी असे आवाहन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले आहे.शासन आपल्या दारी योजनेंतर्गत संजय गांधी तालुकास्तरीय समिती सदस्य तथा तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात बैठक संपन्न झाली

बैठकीत संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाल योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना या योजनांमधील आलेल्या प्रकरणांची तपासणी करण्यात आली.यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील ८६ प्रकरणे मंजूर करण्यात आली. श्रावणबाळ योजनेत ३२८ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर सहा प्रकरणे नामंजूर करण्यात आली.इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेत ११० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेत ३० प्रकरणे मंजूर करण्यात आली तर एक प्रकरण नामंजूर करण्यात आली.

बैठकीत ५५४ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर सात प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत.२०४ प्रकरणामध्ये त्रुटी असल्यामुळे ते प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत अशा लाभार्थ्यांनी कागदपत्रांची त्वरित पूर्तता करावी असे आवाहन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले आहे.शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी शासन आपल्या दारी योजना सुरु केली असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती चव्हाण यांनी केले आहे.

यावेळी लाभार्थ्याना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.बैठकीस नायब तहसीलदार दिलीप पाटील,अव्वल कारकून विनायक मानकुंबरे,गोपाल शिरसाठ,स्वाती भोसले यांचेसह महसूल कर्मचारी उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार