नाशिक :- जिल्ह्यात ‘एसीबी’ने अनेक लाचखोरांवर धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. आता नाशिकमधील आणखी एक बड्या अधिकाऱ्यावर ‘एसीबी’ने कारवाई केली आहे. नाशिकच्या दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी तब्बल 40 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर ‘एसीबी’ने कारवाई केली आहे.त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
एका खासगी कंपनीची जमीन एनए (अकृषक) करण्यासाठी उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) निलेश अपार यांनी तब्बल 40 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर या प्रकाराची ‘एसीबी’कडे तक्रार करण्यात आली होती.तक्रारदार यांची दिंडोरी येथे कंपनी आहे. या कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषीक (एनए) परवानगी न घेतल्याने त्यांच्या कंपनीस प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती. पण सदर कंपनीवर कारवाई न करण्यासाठी आणि बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी 50 लाखांची मागणी केली होती. मात्र, तडजोड करत 40 लाख रुपये स्विकारण्याची तयारी निलेश अपार यांनी दर्शवली होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश अपार यांची एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, थेट उपविभागीय अधिकाऱ्यानेच तब्बल 40 लाखांची लाच मागितल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. निलेश अपार यांनी लाचेची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात ‘एसीबी’कडे सदर व्यक्तीने तक्रार केली होती. त्यानंतर तक्रारीची शहानिशा करून कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून ‘एसीबी’ने धडाकेबाज कारवाई करत अनेकांवर गुन्हे दाखले केले आहेत. त्यानंतर आज थेट उपविभागीय अधिकाऱ्यांवर 40 लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पुर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा…आ.अमोलदादा पाटील
- एका वयस्कर व्यक्तीस अंघोळ करताना नग्नावस्थेतील तरुणीच्या व्हिडीओ कॉल आला मग….. ब्लॅकमेलिंग करून 14 लाख 66 हजार उकळले,काय आहे प्रकरण वाचा.
- गुगलच्या मदतीने बनविलेले विषारी फुलांचे ज्यूस पाजून सैतान मुख्याध्यापिका पत्नीनं शिक्षक पतीला संपवलं; विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह पण……
- ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कमेची घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मेहूणबारे पोलिसांनी केले जेरबंद.
- सासूने घेतला चोरीचा आरोप कंटाळून महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात मारली उडी वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला.