नाशिक :- वसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख शुभांगी ताई पाटील यांनी नुकताच नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे महिला संघटन वाढावे यासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात संपर्क दौरा केला. नाशिक जिल्ह्यातील चांदवड, मनमाड, मालेगाव, निफाड, येवला, इत्यादी तालुक्यांमध्ये शुभांगी ताई पाटील यांनी दौरा करत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत विविध ठिकाणी मीटिंग आयोजित केल्या.
या दौऱ्यात शुभांगी ताई पाटील यांच्यासोबत मुंबईहून आलेल्या शिवसेनेच्या नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख रंजनाताई नेवाळकर तसेच गायत्री ताई व नाशिक जिल्ह्यातील महिला पदाधिकारी यादेखील दौऱ्यात सामील होत्या. या महिला नेत्यांनी नाशिक जिल्ह्यात जुन्या जाणत्या महिला नेत्या व नवोदित पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सांगड घालत जिल्ह्यात महिला आघाडीचे कार्य वाढीसाठी मार्गदर्शन केले तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण व्हावे यासाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करावी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या योजना आणून पक्षातील महिलांना सक्षम करावे याबाबत मार्गदर्शन केले. एखादा पुरुष नेता केवळ घरातील प्रमुख व्यक्तीला भेटून आपले कार्य करू शकतो , परंतु महिला पदाधिकारी या लोकांच्या चुलीपर्यंत जाऊन माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य व ध्येय धोरण लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. म्हणून महिला आघाडी देखील तितकीच महत्त्वाची आहे असे सांगत महिलांना पुढील कार्यासाठी मार्गदर्शन केले.
या दौऱ्यात चांदवड तालुक्याच्या तालुकाप्रमुख रोशनी ताई निफाड तालुक्याच्या तालुका प्रमुख सौ पवार ताई श्री वेदमुथा सर तसेच जिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुख व वेगवेगळ्या तालुक्याच्या तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष व पदाधिकारी, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख ,पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक