सिक्कीममधील एका दुर्दैवी घटनेत महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण आले आहे. या घटनेनंतर जवानाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
धुळे : जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावचे रहिवासी तथा भारतीय लष्करातील लान्स नायक मनोज संजय माळी यांना वीरमरण आले आहे. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी संजय माळी यांना सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. या घटनेची माहिती वाघाडी गावात येताच माळी कुंटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला अन् गावावर शोककळा परसरली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार २४ मार्च २०१९ ला भारतीय लष्करात भरती झालेले मनोज संजय माळी हे लान्स नायक या पदावर कार्यरत होते. त्यांची सिक्कीम येथे नियुक्ती करण्यात आली होती. आज पहाटे सिक्कीम येथे लान्स नायक मनोज संजय माळी हे उंच डोंगराळ प्रदेशात कर्तव्य बजावत असताना त्यांचा अचानक पाय घसरला. आणि ते थेट ५०० ते ६०० फूट खोल दरीत कोसळले. या घटनेत जबर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबतच्या लष्कराकडून त्वरीत शोध सुरू करण्यात आला.
आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास लान्स नायक मनोज माळी यांचा मृतदेह शोध पथकास मिळून आला. यानंतर सिक्कीम येथील लष्कराच्या रुग्णालयात त्यांचा मृतदेह नेण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान, या घटनेची माहिती आज दुपारी वाघाडी (ता. शिरपूर जि.धुळे) येथे कुटुंबीयांना कळवण्यात आली. तरुण मुलाच्या मृत्यूने माळी कुटुंबीयांवर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला. हे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरले आणि अवघे गाव माळी कुटुंबीयांना धीर देण्यासाठी एकत्र आले.
शहिद जवान मनोज माळी यांच्या पश्चात वडील संजय बुधा माळी, भाऊ चेतन आणि आई सुरेखा माळी हे तिघे जण आहेत. वडील गावातच शेती करतात. लान्स नायक मनोज माळी यांचं पार्थिव उद्या वाघाडी गावात आणले जाणार असल्याची प्राथमिक गावकऱ्यांनी दिली आहे.
हे पण वाचा
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..