Why should we Avoid Curd and Milk in Monsoon? पावसाळ्यात दही-दूधाने खरंच पोटाला काही अपाय होतो का?
संपूर्ण भारतात पावसाने हजरी लावली आहे. रिमझिम सरीसोबत गारवा हवाहवासा वाटतो. परंतु, गारव्यासह पावसाळा अनेक आजार देखील घेऊन येतो. पावसाळ्यात अनेक आजार पसरण्याचा धोका वाढतो. म्हणूनच या काळात आरोग्याची तशीच खाण्या – पिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पावसाळ्यात काही पदार्थ खाणे वर्ज्य असते. त्यात दूध आणि दह्याचा देखील समावेश आहे.
परंतु, पावसाळ्यात दूध आणि दही का खाऊ नये? मॉन्सूनमध्ये दूध – दही खाल्ल्याने काय होते? यासंदर्भात, ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी, पावसाळ्यात दूध आणि दह्याचे सेवन कमी प्रमाणात का करायला हवा याची माहिती दिली आहे.
जंतू पसरतात.

पावसाळ्यात हिरवळ वाढते, यासह किटाणू देखील वाढते. हे किडे गाय, म्हैस, शेळी यांच्या चारांमध्ये जाऊन बसतात. हे जंतू जनावरांच्या पोटात जातात. जनावरे जेव्हा दूध देतात, तेव्हा त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला इजा होऊ शकते. त्यामुळे दूध उकळून किंवा कमी प्रमाणात प्यावे.
पचनाची समस्या.

पावसाळ्यात पचनक्रिया थोडी मंदावते, त्यातच या ऋतूत आपण दूध – दही खाल्ले तर मेटाबॉलिज्म बिघडू शकते. त्यामुळे ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यामुळे, पोटात संसर्ग होण्याचा धोकाही बराच वाढतो. अशा स्थितीत दूध – दही कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला मिळतो.
सर्दी.

उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे आहारात आपण दह्याचा समावेश करतो. परंतु, पावसाळ्यात वातावरण थंड असते. त्यामुळे दही खाल्ल्यास सर्दी – खोकल्याचा त्रास वाढू शकतो. किंवा तापही येऊ शकतो. म्हणून पावसाळ्यात दही खाणे टाळावे.
हे वाचलंत का ?
- Viral Video:परमेश्वरा अशी सून नको रे बाबा! आजारग्रत सासू अन् सासऱ्याला डॉक्टर सूनेची अमानुषपणे मारहाण पाहुन व्हिडिओ तुम्हीपण अवाक् व्हाल.
- पत्नीने प्रियकराला बोलावले घरी, अचानक पती आला घरी त्याने पत्नीस प्रियकरा सोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीच्या संयम सुटला अन्……
- सैनिक एन्क्लेव्ह मधील एका रूममध्ये आठ मुली, बाहेर मुलांची तोबा गर्दी, पोलिसांना आला संशय अचानक टाकला छापा,अन् त्यांना धक्का बसला….
- जळगाव तालुक्यात भरदिवसा माजी उपसरपंचावर चाकू आणि चॉपरने वार करून केली निघृण हत्या.घरच्यांचा आक्रोश.
- नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही संपविले जीवन; ज्या नातूसअंगाखांद्यावर खेळवल तो डोळ्यासमोर गेल्याने आजोबांनी पेटत्या चितेत उडी मारून दिला जीव.