अमळनेर:- तालुक्यातील लोणचारम येथे ३९ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाच्या नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना दिनांक ४ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणचारम येथील शेतकरी संदीप प्रकाश पाटील (वय ३९) याने दिनांक ४ रोजी सकाळी ८ वाजेच्या आधी राहत्या घरी बेडरूममध्ये उभ्या भिंतीच्या कडीला दोरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
त्यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यास उतरवत अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. चुलतभाऊ विवेक पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ भरत श्रीराम ईशी हे करीत आहेत.
सदर शेतकऱ्याच्या पश्चात वडील, पत्नी, व ६ वर्षाची मुलगी असून त्यांच्याकडे ५ बीघे कोरडवाहू शेती होती. तसेच त्यांच्यावर असलेल्या गृहकर्ज, उसनवारी व इतर कर्जामुळे ते गेल्या काही दिवसापासून नैराश्यात वावरत असल्याची माहिती मिळाली आहे. व त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






