अमळनेर l प्रतिनिधी
बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी बाबासाहेब पुरंदरे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकत्रित शिल्प तयार करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणून बुजून काही समाजकंटक प्रयत्न करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असून आमचे आराध्य दैवत ही आहेत. तसेच सर्व महापुरुषांचे व महाराष्ट्रातील जनतेचे ते आदर्श आहेत. महापुरुषांचा योग्य तो सन्मान नेहमीच आपण करीत असतो.
आणि त्यांची बरोबरी कोणाही व्यक्ती बरोबर आपण करीत नाहीत तरी सुध्दा समाजामध्ये गैरसमज निर्माण व्हावा व दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण व्हावी आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली स्वार्थाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काही ठराविक संघटना करीत असतात व नेहमीच समाजात अस्थिर वातावरण तयार करीत असतात.बाबासाहेब पुरंदरे ने सांगितलेला इतिहास आम्हाला कधीही मान्य नाही आणि त्यांच्या विचारांशी आमचा नेहमी वैचारिक विरोध राहिला आहे.हे शिल्प तयार करून ज्यांनी हे षडयंत्र तयार केले आहे.
त्यांच्या वरती व ज्यांनी हे बालगंधर्व रंगमंदिरात लावले त्या व्यक्तीवर तसेच ज्यांनी परवानगी दिली त्या व्यक्तीवर तेढ निर्माण करण्याचे खटले दाखल करत तात्काळ कार्यवाही करावी.तसेच ते शिल्प तिथून तात्काळ हटवत ह्या शिल्पावर कायम स्वरुपी बंदी आणण्याची मागणी आम्ही करीत आहोत. असे निवेदन मा.उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना देण्यात आले. यावेळी संघर्ष मोर्चा च्या प्रतिभा ताई शिंदे, प्रा. अशोक पवार सर,गौतम मोरे,जयंतलाल वानखेडे, बापूराव ठाकरे, दिपक काटे,सुरेश कांबळे,हितेंद्र बडगुजर, नुरखान, कमलेश वानखेडे,विक्की जाधव आणि सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






