शिलवंत व कांबळे खून प्रकरणात कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी वैभव गिते यांनी स्वीकारली

Spread the love

ठाणे :- जिल्ह्यातील जातीय अत्याचारातील दोन खून प्रकरणात नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस चे राज्य सचिव मां. वैभव गीते यांनी पीडित कुटुंबियांना भेटी दिल्या. व त्यांचे सांत्वन केले.दोन्ही खून प्रकरणात पीडित कुटुंबियांना भेटणारे ते पाहिले व एकमेव नेते आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली यांना तपासात अधिक पुरावे गोळा करण्याच्या त्यांनी सुचना केल्या. उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण परिमंडळ यांच्याकडे कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची व विशेष सरकारी वकिलांचे नियुक्तीची मागणी केली.दोन्ही कुटुंबाचे पुनर्वसन तात्काळ करा अन्यथा एन. डी.एम.जे. चा वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाजकल्याण व महसूल विभागास त्यांनी दिला.

यावेळी तपासात असलेली प्रगती पोलीस विभागाने सांगितली. त्या सर्व आरोपींना अटक केली असून न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलीस विभागाने सांगीतले. दरम्यान दक्षता समितीचे सन्माननीय सदस्य,नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी वैभव गीते यांनी ठाणे जिल्ह्यातील चार खून प्रकरणात शासकीय नोकरी लाऊन पुनर्वसन केले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार