वडिलोपार्जित जमिनीच्या हिस्सेवाटणीत दोन भावांमध्ये वाद,भाऊ, पुतण्याकडून मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू.

Spread the love

शिरपूर :- वडिलोपार्जित जमिनीची दोन भावांमध्ये हिस्सेवाटणी करायची होती. मात्र या हिस्सेवाटणीतून भावांमध्ये वाद झाला. यात सख्ख्या भावासह पुतण्यांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

जैतपूर (ता. शिरपूर) येथे हि घटना ही घटना १५ सप्टेंबरला घडली. जैतपूर शिवारात मोंडूसिंह अंबरसिंह राजपूत यांची शेती आहे. त्यांच्या शेताची हिस्सेवाटणी झालेली नाही. त्यांच्या सहा मुलांपैकी विजयसिंह राजपूत (रा. जैतपूर) यांच्या वाट्याला केवळ दोन एकर शेती आली. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त शेती मिळावी, अशी मागणी भावांकडे केली होती. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होते.

शेतीच्या वाटणीवरून भावांमध्ये वाद झाला. दरम्यान १४ सप्टेंबरला ते शेतात बैल घेण्यासाठी गेले असता ‘तुम्हाला ट्रॅक्टर, म्हशी यापैकी काहीच देणार नाही, शेतात पाय ठेवू नका’ अशी धमकी संशयितांनी दिली होती. यानंतर मोंदूसिंग राजपूत यांना मारहाण करण्यात आली. यात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. थाळनेर पोलिसांनी संशयितांना अटक केली.

हे पण वाचा

टीम झुंजार