शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत रेल्वेसमोर उडी मारत शेतकऱ्याने संपविले जीवन.

Spread the love

जळगाव : शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना जळगाव तालुक्यात घडली. लमांजन येथील शेतकऱ्याने कुऱ्हाडदे ते शिरसोली दरम्यान रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केली. सदरची घटना २ मार्चला सायंकाळी उघडकीस आली.

दरम्यान कैलास पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून २ मार्चला सायंकाळी कुऱ्हळदे ते शिरसोली दरम्यानच्या धावत्या रेल्वे समोर येवून आत्महत्या केली. ही बाब लक्षात आल्यानंतर रेल्वेचे लोकोपायलट यांनी शिरसोली रेल्वे स्टेशन मास्तरांना कळविली. त्यानंतर लमांजनचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार