प्रतिनिधी l अमळनेर
अमळनेर :- तालुक्यातील झाडी येथे शुक्रवारी १५ मार्च रोजी मध्यरात्री २.३० वाजता अचानक लागलेल्या भीषण आगीत २० बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यात तीन लाखांचे नुकसान झाले आहे.याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील झाडी येथे शिवदास यादव भिल हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेळी पालन करून ते आपला उदरनिर्वाह करतात.
घराच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत बकऱ्या बांधलेल्या होत्या. शुक्रवारी १५ मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास झोपडीला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर शिवदास भिल यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना घटना कळवताच त्यांनी अग्निशमन बंब पाठविलाा. अग्निशमन दलप्रमुख दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख, आनंदा झिम्बल यांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. तब्बल २० शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात शिवदास भिल यांचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत मारवड पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ