रामपूर :- उत्तर प्रदेशातील रामपूरमधील बिलासपूर येथे एका 3 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून त्यानंतर तिची विकृत पद्धतीने निघृण हत्या करण्यात आली आहे. ही हत्या मृत मुलीच्या वडीलांच्या प्रेयसीने केली असल्याचे समजते.या भयंकर घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 7 एप्रिल रोजी मृत मुलीचे वडील दानिश यांनी रामपूर येथील पोलिस स्थानकात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. तक्रार नोंदवल्याच्या तीन दिवसानंतर मुलीचा मृतदेह एका मोकळ्या भूखंडावर फेकून दिलेल्या अवस्थेत आढळला.
दोन्ही पाय कापलेले आणि शीर एका प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून फेकण्यात आला असल्याने भटक्या प्राण्यांनी त्यावर हल्ला केला असल्याच्या खूणा आढळून आल्या. मुलीची हत्या तिच्याच वडिलांच्या प्रेयसीने केली असल्याचे पोलिस तपासात आढळून आले. रविवारी मुलगी दुकानातून चॉकलेट आणण्याकरीता शेजारील दुकानात गेली होती. त्यावेळी वडिलांच्या प्रेयसीने तिचे अपहरण केले. बराच वेळ उलटला तरी मुलगी घरी न आल्याने घरातल्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. दिवस उलटून गेल्यानंतरही मुलीचा शोध न लागल्याने दानिश यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.मंगळवारी सकाळी एका मोकळ्या भूखंडावर मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
बुधवारी आरोपी फरनाज (20) हिला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरनाज आणि दानिश यांचे प्रेमसंबंध होते. पण दानिशला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. फरनाज आणि दानिशची पत्नी यांचे फोनवर अनेकदा वाद देखील होत. याच सूड भावनेने तिने संधीचा फायदा करत मुलीचे अपहरण करून, गळा आवळून तिचा खून केला. याशिवाय रात्रीच्या वेळी सामसूम झाल्यानंतर घराच्या गच्चीवरून मोकळ्या भूखंडावर मृतदेह फेकून दिला. जेणेकरून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृतदेह असल्याचे समजणार नाही. तसेच जनावरांनी मृतदेह खाल्ल्यानंतर केलेल्या गुन्ह्याची उकलही होणार नाही.
हे पण वाचा
- शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पुर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा…आ.अमोलदादा पाटील
- एका वयस्कर व्यक्तीस अंघोळ करताना नग्नावस्थेतील तरुणीच्या व्हिडीओ कॉल आला मग….. ब्लॅकमेलिंग करून 14 लाख 66 हजार उकळले,काय आहे प्रकरण वाचा.
- गुगलच्या मदतीने बनविलेले विषारी फुलांचे ज्यूस पाजून सैतान मुख्याध्यापिका पत्नीनं शिक्षक पतीला संपवलं; विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह पण……
- ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कमेची घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मेहूणबारे पोलिसांनी केले जेरबंद.
- सासूने घेतला चोरीचा आरोप कंटाळून महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात मारली उडी वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला.