लखनऊ : लग्नाचा दिवस प्रत्येक नवरी आणि नवरदेवासाठी अतिशय खास असतो. मात्र, कधीकधी लग्नातच अशा काही घटना घडतात, ज्या सगळ्यांच्याच नेहमी लक्षात राहतात. एका लग्नसमारंभात अशीच एक अतिशय विचित्र घटना घडली.यात वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान अचानक नवरी बेशुद्ध झाली. नवरी बेशुद्ध पडताच मंडपात एकच गोंधळ उडाला. तर दुसरीकडे वऱ्हाडीही वेगवेगळ्या चर्चा करू लागले. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात वधू अचानक बेशुद्ध पडल्याची ही घटना घडली.
बेशुद्ध झालेल्या नववधूला तिच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून, तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.कडक उन्हाचा परिणाम महोबामध्ये दिसू लागला आहे. विवाह सोहळ्याच्या आनंदात वरमाळेचा कार्यक्रम सुरू असताना मध्येच नववधू अचानक बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी वधूला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. वधूच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांची मुलगी सकाळपासून उपवास करत होती आणि यावेळी खूप उष्णता होती. कदाचित त्यामुळेच तिची तब्येत अचानक बिघडली असावी.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तिच्यावर उपचार करत असून, ती लवकरच बरी होईल.महोबा जिल्हा रुग्णालयाच्या बेडवर असलेल्या नवविवाहितेला पाहण्यासाठी लग्नाच्या पाहुण्यांनी मोठी गर्दी केली होती. लग्नघरातून वधू अचानक गायब झाल्याच्या बातमीने लोकांना धक्का बसला. लग्नाची मिरवणूक येताच वधूचे कुटुंब अचानक कुठे आणि कसे गायब झाले याचं प्रत्येक पाहुण्याला आश्चर्य वाटलं. मात्र जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये तीव्र उष्णतेनं त्रस्त झालेल्या वधूवर उपचार सुरू असल्याचे पाहून सर्वच वऱ्हाडी आणि वधूच्या नातेवाईकांना सत्य समजलं. डॉक्टरांनी वधूला सांगितलं की, ती अति उष्णतेमुळे बेशुद्ध झाली होती.
हे पण वाचा
- शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पुर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा…आ.अमोलदादा पाटील
- एका वयस्कर व्यक्तीस अंघोळ करताना नग्नावस्थेतील तरुणीच्या व्हिडीओ कॉल आला मग….. ब्लॅकमेलिंग करून 14 लाख 66 हजार उकळले,काय आहे प्रकरण वाचा.
- गुगलच्या मदतीने बनविलेले विषारी फुलांचे ज्यूस पाजून सैतान मुख्याध्यापिका पत्नीनं शिक्षक पतीला संपवलं; विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह पण……
- ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कमेची घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मेहूणबारे पोलिसांनी केले जेरबंद.
- सासूने घेतला चोरीचा आरोप कंटाळून महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात मारली उडी वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला.