जळगाव :- शहरातील दूध फेडरेशन राजमालती नगरातील २६ वर्षीय विवाहिता सात वर्षीय मुलांसह दोन महिन्यांपासून बेपत्ता झाली आहे. पोलिसांत हरविल्याची तक्रार देऊन पत्नी व मुलाचा शोध लागत नसल्याने हवालदिल पिता रोज पोलिस ठाण्याच्या चकरा मारत आहे.जळगाव शहरातील दूध फेडरेशन राजमालतीनगरात मिथुन जाधव (वय ३५) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. रेल्वे मालधक्क्यावर हमाली करून ते कुटुयबाची गुजराण करतात.
त्यांची पत्नी शारदा जाधव (वय २६) बचत गटाचे पैसे भरायला जाते, असे सांगून मुलगा रूपेश (वय ७) याला घेऊन घरातून गेली. ती अद्याप परत आलेली नाही. याबाबत शहर पोलिसांत हरविल्याची तक्रार नोंदवून दोन महिने उलटले, तरी पोलिसांना या महिलेचा शोध घेता येत नसल्याने मिथुन जाधव नियमितपणे पोलिस ठाण्यात चकरा मारून चौकशी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलांचे एकाकीपण पाहावेना
मिथुन जाधव यांना तीन मुले असून, पत्नी शारदा निघून गेल्यानंतर दोन्ही मुले त्यांच्याजवळच राहतात. दिवसभर मालधक्यावर हमाली करून थकून भागून आल्यावर घरी मुलांसाठी स्वतःला स्वयंपाक करावा लागतो.मुलांना त्यांच्या आईची ओढ असून, त्यांचे प्रश्न बेजार करणारे व निरुत्तर करून जातत. साधारण एक ते दीड वर्षापूर्वी पत्नी शारदा अजय दिलीप जाधव (रा. संभाजीनगर, कैकाडी वाडा, रावेर) याच्यासोबत निघून गेली हेाती.
आताही त्याच्यासोबत निघून गेल्याचे मी वारंवार पोलिसांना सांगितले. गावात इतरांना ती त्याच्यासोबत दिसते. मात्र, पोलिसांना तिचा शोध लागत नाही. ती माझ्या सोबत राहण्यास तयार नसेल, तर किमान पोलिसांनी तसे लिखित पत्र मिळवून द्यावे, अशी विनवणी मिथुन जाधव यांनी केली आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






