लखनऊ : लग्नाचं एक अतिशय विचित्र प्रकरण समोर आलं आहे. यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांतच नवरी प्रियकरासह पळून गेली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा पोलीस स्टेशन परिसरातून समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांतच नवरी प्रियकरासह पळून गेली. मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणीचं 21 एप्रिल रोजी सिक्रीगंज पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणाशी लग्न झालं होतं.
विधीनुसार लग्नानंतर 10 दिवसांनी मुलीला माहेरच्या घरून निरोप दिला जातो, त्यामुळे मुलगी घरीच होती आणि बाकीचे विधी चालू होते. तेव्हाच अचानक नवरी ृ गायब झाली. नवरी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. सुरुवातीला त्यांनी आपापल्या स्तरावर शोध घेतला मात्र मुलगी कुठेच न मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठले. कुटुंबीयांनी गावातील विनय यादव या तरुणावर मुलीला पळवून नेल्याचा आरोप केला.
कुटुंबीयांनी फिर्यादीत म्हटलं आहे की, गावातील युवक विनय यादव अनेक दिवसांपासून त्यांच्या मुलीला त्रास देत होता. मुलीचे लग्न ठरल्याने तो संतापला. लग्नानंतर तो मुलीला स्वतःसोबत घेऊन गेला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनय यादव या तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिसांनी लवकरच विनय यादव आणि तरुणीला अटक केली.मुलीने कोर्टात जबानी दिल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. मुलीने कोर्टात सांगितलं, की ती प्रौढ आहे आणि तिच्या इच्छेने तरुणासोबत गेली होती. तिला फक्त विनय यादवसोबत राहायचं आहे. मुलीच्या जबाबाच्या आधारे न्यायालयाने दोघांची सुटका केली. सहजनवा पोलीस ठाण्याचे प्रभारी मदन मोहन मिश्रा म्हणाले, ‘मुलगा आणि मुलगी दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं . कोर्टात मुलीने विनय यादवसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






