अहमदनगर:- श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथील ४० वर्षीय वयातील महिलेला तिचा गावातील प्रियकर राजेंद्र जगनाथ देशमुख व त्याचा साथीदार बिभीषण सुरेश चव्हाण (रा. बाभळगाव, ता. इंदापूर, जि.पुणे) यांनी सातारा येथे घेऊन जात तेथे तिचा गळा आवळून खून केला.तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी नजीकच्या कालव्यात मृतदेह फेकून दिला. या घटनेनंतर पाच ते सहा दिवसांतच पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. २९ मे रोजी ही खुनाची घटना घडली होती.
राजेंद्र देशमुख याचे गेल्या पाच महिन्यांपासून सदर महिलेशी प्रेमसंबंध होते. सदर महिला राजेंद्र याला सोबत राहण्याचा हट्ट करत होती. त्यामुळे राजेंद्र याने बिभीषण चव्हाण याच्या तिचा खून करण्याचा कट रचला. २९ मे रोजी हे दोघे तिला सातारा परिसरात घेऊन गेले. तेथे त्यांची पुन्हा वादावादी झाली आणि त्याच ठिकाणी दोघा आरोपींनी महिलेचा गळा आवळून खून करत मृतदेह कालव्यात फेकून दिला. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर अभंग हे करत आहेत.
मंगळसुत्रामुळे फुटली वाचा
मृत सुभद्राच्या गळ्यात श्रीगोंदा येथील सराफाचा शिक्का असलेले मंगळसूत्र होते. मंगळसुत्रावरील शिक्का पाहून सातारा पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधला व श्रीगोंदा पोलिसांनी स्थानिक ठिकाणी चौकशी करून दोघा आरोपींना अटक केली.
हे पण वाचा
- शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पुर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा…आ.अमोलदादा पाटील
- एका वयस्कर व्यक्तीस अंघोळ करताना नग्नावस्थेतील तरुणीच्या व्हिडीओ कॉल आला मग….. ब्लॅकमेलिंग करून 14 लाख 66 हजार उकळले,काय आहे प्रकरण वाचा.
- गुगलच्या मदतीने बनविलेले विषारी फुलांचे ज्यूस पाजून सैतान मुख्याध्यापिका पत्नीनं शिक्षक पतीला संपवलं; विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह पण……
- ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कमेची घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मेहूणबारे पोलिसांनी केले जेरबंद.
- सासूने घेतला चोरीचा आरोप कंटाळून महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात मारली उडी वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला.