अहमदनगर:- श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथील ४० वर्षीय वयातील महिलेला तिचा गावातील प्रियकर राजेंद्र जगनाथ देशमुख व त्याचा साथीदार बिभीषण सुरेश चव्हाण (रा. बाभळगाव, ता. इंदापूर, जि.पुणे) यांनी सातारा येथे घेऊन जात तेथे तिचा गळा आवळून खून केला.तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी नजीकच्या कालव्यात मृतदेह फेकून दिला. या घटनेनंतर पाच ते सहा दिवसांतच पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. २९ मे रोजी ही खुनाची घटना घडली होती.
राजेंद्र देशमुख याचे गेल्या पाच महिन्यांपासून सदर महिलेशी प्रेमसंबंध होते. सदर महिला राजेंद्र याला सोबत राहण्याचा हट्ट करत होती. त्यामुळे राजेंद्र याने बिभीषण चव्हाण याच्या तिचा खून करण्याचा कट रचला. २९ मे रोजी हे दोघे तिला सातारा परिसरात घेऊन गेले. तेथे त्यांची पुन्हा वादावादी झाली आणि त्याच ठिकाणी दोघा आरोपींनी महिलेचा गळा आवळून खून करत मृतदेह कालव्यात फेकून दिला. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर अभंग हे करत आहेत.
मंगळसुत्रामुळे फुटली वाचा
मृत सुभद्राच्या गळ्यात श्रीगोंदा येथील सराफाचा शिक्का असलेले मंगळसूत्र होते. मंगळसुत्रावरील शिक्का पाहून सातारा पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधला व श्रीगोंदा पोलिसांनी स्थानिक ठिकाणी चौकशी करून दोघा आरोपींना अटक केली.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.