मलकापूर :- पोळ्याच्या दिवशी दुःखद घटना घडली आहे. पोळ्याच्या दिवशी बैल सजवण्याआधी त्यांना धुण्यासाठी नदीवर घेऊन गेलेल्या दोन शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.देवधाबा येथील प्रवीण काशीराम शिवदे (वय ३२) तर हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर (वय २७) अशी मृतकांची नावे आहेत.घटनेची माहिती मिळताच, मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी तातडीने प्रशासनाला अलर्ट केले.
हरणखेड तालुका मलकापूर येथे व्याघ्रा नदीवर पूर आल्यामुळे पुरात गावातील शेतकरी गोपाळ वांगेकर हा बैल धुण्यासाठी गेला असता बैल व गोपाल हे दोघेही या पुरात वाहून गेले त्यानंतर बुलढाण्याहून रेस्क्यू टीम आल्यावर त्या टीमने शोध घेतल्यानंतर तब्बल तीन तासानंतर गोपाल वांगेकर हा सापडला.यावेळी आ. राजेश एकडे, नगराध्यक्ष हरीश रावळ, संतोषराव रायपुरे, अरुण अग्रवाल, तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार उगले,पोलीस निरीक्षक संदीप काळेसह संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
रेस्क्यू टीम घेऊन घटनास्थळी पोहोचले. दोन्ही शेतकऱ्यांच्या मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून या दुर्दैवी घटनेबद्दल आ. राजेश एकडे यांनी शोक संवेदना व्यक्त करीत मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वंन करीत धीर दिला.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……