मलकापूर :- पोळ्याच्या दिवशी दुःखद घटना घडली आहे. पोळ्याच्या दिवशी बैल सजवण्याआधी त्यांना धुण्यासाठी नदीवर घेऊन गेलेल्या दोन शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.देवधाबा येथील प्रवीण काशीराम शिवदे (वय ३२) तर हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर (वय २७) अशी मृतकांची नावे आहेत.घटनेची माहिती मिळताच, मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी तातडीने प्रशासनाला अलर्ट केले.
हरणखेड तालुका मलकापूर येथे व्याघ्रा नदीवर पूर आल्यामुळे पुरात गावातील शेतकरी गोपाळ वांगेकर हा बैल धुण्यासाठी गेला असता बैल व गोपाल हे दोघेही या पुरात वाहून गेले त्यानंतर बुलढाण्याहून रेस्क्यू टीम आल्यावर त्या टीमने शोध घेतल्यानंतर तब्बल तीन तासानंतर गोपाल वांगेकर हा सापडला.यावेळी आ. राजेश एकडे, नगराध्यक्ष हरीश रावळ, संतोषराव रायपुरे, अरुण अग्रवाल, तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार उगले,पोलीस निरीक्षक संदीप काळेसह संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
रेस्क्यू टीम घेऊन घटनास्थळी पोहोचले. दोन्ही शेतकऱ्यांच्या मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून या दुर्दैवी घटनेबद्दल आ. राजेश एकडे यांनी शोक संवेदना व्यक्त करीत मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वंन करीत धीर दिला.
हे पण वाचा
- धक्कादायक! एका व्यक्तीने आपल्या जिवंत पत्नीला सरकारी कागदपत्रांमध्ये मृत दाखवून प्रेयसीशी केलं लग्न.
- संतापजनक!19 वर्षीय नराधम तरुणाने विवाहित महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी,नकार देताच कटरने केले 15 वार 280 टाके टाकून,गोधडीवानी शिवले पीडितेचे अंग.
- आईनं नशा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे २७ वर्षीय उच्चशिक्षित मुलाने १३ दुचाकी पेटवून दिल्या; माथेफिरू नशेखोर मुलास अटक.
- अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांच्या छापा, 60 किलो मांस जप्त, एक जणांवर गुन्हा दाखल
- आज रविवार रोजी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’चे आयोजन.. राज्यभरातून विविध मान्यवरांची व संविधान प्रेमीची राहणार उपस्थिती.