एरंडोल :- पाच वर्षात राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघाची विकासाचे आदर्श मॉडेल अशी ओळख निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अमोलदादा पाटील यांनी केले.विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल तळई (ता.एरंडोल) येथे ग्रामस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते.माजी आमदार चिमणराव पाटील अध्यक्षस्थानी होते.यावेळी आमदार अमोलदादा पाटील यांनी मतदारसंघाची विकासाची घौडदौड वेगाने सुरु राहील असा विश्वास व्यक्त केला.मतदारसंघातील अपूर्णावस्थेत असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी विश्वास दाखवून विक्रमी मतांनी विजयी केले असून विकासकामांच्या माध्यमातून मतदारांचे ऋण फेडणार असल्याचे सांगितले.पाच वर्षात विकासकामांमुळे मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.माजी आमदार चिमणराव पाटील यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघात सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून अनेक कामे पूर्ण झाले असल्याचे सांगितले. मतदारसंघातील विकासकामांची एक्स्प्रेस वेगाने सुरु राहील असा विश्वास व्यक्त केला.यावेळी विविध राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा आमदार अमोलदादा पाटील,माजी आमदार चिमणराव पाटील व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
ग्रामस्थांच्यावतीने आमदार अमोलदादा पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.आमदार अमोल पाटील,माजी
आमदार चिमणराव पाटील यांचेसह पदाधिका-यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,निलेश पाटील,विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन,प्रभाकर पाटील (दादाजी),बाजार समितीचे संचालक किरण पाटील,माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन,दशरथ पाटील,युवासेनेचे तालुकाप्रमुख कमलेश पाटील, बबलू पाटील,अंतुर्लीचे सरपंच गौरव पाटील,सचिन पाटील,गोविंदा राठोड,सचिन महाजन,माजी सरपंच विनोद महाजन,सोशल मिडीया
प्रमुख अमोल महाजन यांचेसह परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी,विकास संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.