फेसबुकवर झाली ओळख, ऑनलाइन चॅटिंग सुरू मग पडले प्रेमात, एके दिवशी पहिल्यांदाच बागेत झाली भेट, गावकऱ्यांना आली वेगळीच शंका, दोघांना धरलं अन् जबरदस्तीने…

Spread the love

कटिहार :- प्रेमात वेडे झालेले लोक आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काहीही करण्यास तयार असतात. कोणी आपले प्राण द्यायला तयार होतो, तर कोणी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी चोरी देखील करतो. मात्र, बिहारमधून समोर आलेल्या या ‘अजब प्रेम की गजब कहाणी’त वेड्या प्रियकराने ना चोरी केली, ना गुन्हा केला.उलट, केवळ आपल्या प्रेयसीला भेटण्याची किंमत त्याला मोठ्या प्रमाणात चुकवावी लागली.

फेसबुकवर झाली ओळख, प्रेम आणि भेट…

ही घटना बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील फलका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमोल गावाची आहे. पूर्णिया जिल्ह्यातील रहिवासी रवी आणि आमोल गावातील काजल यांची ओळख फेसबुकवर झाली. ऑनलाइन चॅटिंग सुरू झाले आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी बराच काळ फक्त सोशल मीडियावरच संवाद साधला, पण शेवटी प्रत्यक्ष भेटायचं ठरवलं.

प्रेमीयुगुल भेटले आणि घडली अजब घटना…

रवी आणि काजल कटिहारमधील कोढा पार्कमध्ये भेटले. दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या, फोटो काढले, आणि एकमेकांसोबत वेळ घालवला. पण काही गावकऱ्यांनी त्यांना एकत्र पाहिलं आणि परिस्थिती चुकीच्या पद्धतीने समजून घेतली. काही वेळातच गावकऱ्यांनी दोघांना जबरदस्तीने गावच्या हनुमान मंदिरात नेलं आणि काजलच्या कुटुंबीयांना बोलावलं.

प्रेम, विरोध आणि जबरदस्तीचं लग्न!

दोघांनी सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही त्यांचं ऐकून घेतलं नाही. गावकरी आणि कुटुंबीयांच्या दबावामुळे त्याच वेळी दोघांचं मंदिरात लग्न लावून देण्यात आलं. विशेष म्हणजे, या लग्नाला मुलाच्या बाजूने कुणीही उपस्थित नव्हतं. कोढा पार्कमध्ये काढलेली एक साधी सेल्फी अखेर दोघांना थेट लग्नाच्या मंडपात घेऊन गेली. या अजब प्रेम कहाणीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे!

मुख्य संपादक संजय चौधरी