एकनाथ शिंदे यांच्या गटाने अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची हिंमत केली. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे- देवेंद्र फडणवीस
भाजपाच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षात सत्तेवर येणारे सरकार पुढील २५ वर्षे चालेल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेतीलबंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजपाचं सरकार पुढील २५ वर्ष चालेल असा विश्वास व्यक्त करताना एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांचे विशेष आभार मानले. “अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटाने हिंमत केली. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे,” असंही ते म्हणाले.
“येत्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांना न्याय द्यायचा आहे,’ असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी पुढील सूचना येईपर्यंत भाजपाच्या सर्व आमदारांनी मुंबईतच थांबावं असा आदेश दिला.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






