जळगाव :- सध्या देशात गोहत्या करण्याचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच कत्तलीसाठी वाहनात कोंबून घेऊन जात असलेल्या ११ गुरांना शहर वाहतूक शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे २ वाजता नाकाबंदी दरम्यान पकडले आणि गुरांची सुटका केली. या प्रकरणी एम आयडीसी पाेलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शहर वाहतूक शाखेचे वामन महाजन यांच्यासह हकीम शेख, हर्षद गवळी, समा तडवी, साहेबराव कोळी यांचे पथक शुक्रवारी रात्री नाकाबंदी करत होते. यावेळी खेडी परिसरातून एमएच-२०, इजी-१६९१ क्रमांकाचे वाहन त्यांनी तपासले.
यावेळी वाहनात ११ गुरे कोंबलेली दिसून आली. वाहनचालक शकील अहमद पिरजादे (रा. पिरजादेवाडा, मेहरूण) याच्याकडे गुरांच्या वाहतुकीचा परवानादेखील नव्हता. अखेर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन सर्व गुरांची सुटका केली. महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिरजादेविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






