गुजरातमधील बोटाद जिल्ह्यातील रोजिड गावात बनावट दारू पिऊन किमान 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेनी गुजरातचे गृहसचिव राजकुमार यांनी सांगितले की या घटनेला गांभीर्याने घेण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
40 जणांची प्रकृती अस्थिर आहे. या लोकांना भावनगर, बोटाद आणि अहमदाबादला पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे.
काही महिन्यांपूर्वीच दिली होती तक्रार
रोजिड गावचे सरपंच जिगर डुंगरानी यांनी या घटनेसाठी सरकारी यंत्रणेला जबाबदार धरत निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, तीन चार महिन्यांपूर्वीच मी प्रशासन, एसपी, पीएसआय, तहसिलदार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर जर कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती. पण त्यांनी या तक्रारीकडे लक्ष दिले नाही.
या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळे पथक तैनात केले आहे आणि या इतर भागात बनावटी दारूची विक्री होत असेल तर हे तपासण्यासाठी सांगितले आहे.
हेही वाचलंत का?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






