मुंबई :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच आता अब्दुल सत्तार यांनी मोठं व्यक्तव्य केल आहे. आमच्या 50 जणांपैकी पहिला राजीनामा मी देणार आहे, असं वक्तव्य शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
“मी अर्जुन खोतकर आणि हेमंत पाटील यांना भेटण्यासाठी दिल्लीत आलोय. त्यांना निर्णय घेण्यासाठी इतका उशीर का लागतोय, हे जाणून घेण्यासाठी मी दिल्लीत आलोय,” असं सत्तार म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान केलं आहे. याविषयी बोलताना सत्तार म्हणाले, “31 तारखेला माझ्याकडे महामेळावा आहे, मुख्यमंत्र्यांचा सत्कार आहे. त्यांचे आभार मानणार आहे.त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम सिल्लोड मतदारसंघात ठेवलेला आहे.
“माझं मन स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची परवानगी दिली, तर मी राजीनामा देणार आहे.”
येत्या 3 तारखेच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असंही ते म्हणाले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे त्यांच्या दौऱ्यानिमित्त फिरत असताना, प्रत्येक सभेत बंडखोर आमदारांना आव्हान देत आहेत की, राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावं. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानाला अब्दुल सत्तारांनी हे उत्तर दिलंय.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






