नाशिक :- जिल्ह्यात ‘एसीबी’ने अनेक लाचखोरांवर धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. आता नाशिकमधील आणखी एक बड्या अधिकाऱ्यावर ‘एसीबी’ने कारवाई केली आहे. नाशिकच्या दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी तब्बल 40 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर ‘एसीबी’ने कारवाई केली आहे.त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
एका खासगी कंपनीची जमीन एनए (अकृषक) करण्यासाठी उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) निलेश अपार यांनी तब्बल 40 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर या प्रकाराची ‘एसीबी’कडे तक्रार करण्यात आली होती.तक्रारदार यांची दिंडोरी येथे कंपनी आहे. या कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषीक (एनए) परवानगी न घेतल्याने त्यांच्या कंपनीस प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती. पण सदर कंपनीवर कारवाई न करण्यासाठी आणि बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी 50 लाखांची मागणी केली होती. मात्र, तडजोड करत 40 लाख रुपये स्विकारण्याची तयारी निलेश अपार यांनी दर्शवली होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश अपार यांची एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, थेट उपविभागीय अधिकाऱ्यानेच तब्बल 40 लाखांची लाच मागितल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. निलेश अपार यांनी लाचेची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात ‘एसीबी’कडे सदर व्यक्तीने तक्रार केली होती. त्यानंतर तक्रारीची शहानिशा करून कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून ‘एसीबी’ने धडाकेबाज कारवाई करत अनेकांवर गुन्हे दाखले केले आहेत. त्यानंतर आज थेट उपविभागीय अधिकाऱ्यांवर 40 लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: एका १८ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला; स्थानिकांच्या मदतीने वाचला जीव पहा अंगाच्या थरकाप होईल असा व्हिडिओ.
- बिबट्या पतीच्या नरडीचा घोट घेणार, तोच पत्नी आली रणरागिणी बनून बिबट्याशी एक तास झुंज देऊन पतीचे वाचविले प्राण, सर्वत्र कौतुक.
- संतापजनक;रक्षकच बनला भक्षक! महिलादिनानिमित्त सत्काराला बोलावून पोलिस कर्मचाऱ्यानेच केला महिलेवर बलात्कार, नागरिकांमध्ये संताप.
- एका व्यक्तीने त्याच्या दोन प्रेयसींसोबत मिळून तिसऱ्या प्रेयसीची केली हत्या; काय आहे प्रकरण व पोलिसांनी आरोपीच्या शोध कसा लावला, वाचा संपूर्ण बातमी.
- छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे अभिवादन; संभाजी महाराजांचे बलिदान म्हणजे राष्ट्रप्रेमाचा सर्वोच्च आदर्श – मंत्री गुलाबराव पाटील