जालना :- घर म्हटले की वाद होतातच पती -पत्नी मध्ये वाद होणे हे सामान्य आहे.वाद होतात आणि मिटतात देखील.पण बीड जिल्ह्यात बायकोसह सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नितीन विनायक शेळके असे या मयत जावयाचे नाव आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटना जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात लोणी गावातील नितीन विनायक शेळके यांचे लग्न माजलगाव तालुक्याच्या श्रीक्षेत्र बाभळगावच्या रुपाली रुस्तुम सुरवसे हिच्याशी 2020 साली झाला. 6 महिन्यानंतरच नवरा -बायकोत वाद सुरु झाले. त्यानां एक मुलगी झाली तिचे नाव नेहा ठेवले. नितीनला त्याची बायको रुपाली नेहमी वेगळे राहण्यासाठी बोलायची शेतीची वाटणी करण्यासाठी सतत बोलायची. त्यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचे. या वरून नितीनच्या सासरचे मंडळी नितीनला सतत मानसिक त्रास द्यायचे.

दरम्यान नितीनची बायको दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी आली होती. त्याच्या मोठ्या मुलीचा नेहाचा वाढदिवस असल्यामुळे तो सासरी आला होता. त्यावेळी त्या दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून भांडण झाले. यावरून सासरच्या मंडळीने देखील त्याला सुनावले. सततच्या सासरच्या मंडळी तसेच बायको कडून मिळणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाउल उचलले. त्याने विष प्राशन करून आपले आयुष्य संपविले. या प्रकरणी नितीनचा भाऊ प्रशांत शेळके यांच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींच्या विरोधात बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






