नाशिक:-मधून मोठी बातमी समोर आली आहे. विवाहितेनं आपल्या दोन चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेनं आपल्या दोन मुलांसह जीवन संपवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिलेच्या पतीसह सासू आणि दिराला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही घटना दिंडोरी तालुक्यातील खतवडमध्ये घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एका विवाहितेने आपल्या दोन चिमुकुल्यासह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिंडोरीच्या खतवड येथे घडली आहे. अश्विनी मुळाने असे या विवाहितेचे नाव असून तिने 9 वर्षाचा सिद्धेश मुळाणे आणि सहा वर्षांचा विराज मुळाणे या मुलांनासोबत घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान माहेरून तीन लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळीकडून तिचा छळ केला जात होता, या जाचाला कंटाळून तिने आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासू आणि दिराला अटक केली आहे. त्यांच्याविरोधात विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.